यमुनेच्या डोहात कालिया नावाचा महाविषारी सर्प होता. त्याच्या साध्या फुत्काराने सुध्दा सर्व काही भस्मसात होई. श्रीकृष्णाने कालिया नागाला ठार मारले व गोकुळातील लोकांचे रक्षण केले तो दिवक म्हणजेच श्रावण शुध्द पंचमी (नागपंचमी) तेव्हापासून लोक नागाची पूजा करून लाह्या, दूध देतात. या दिवशी नागदेवतेबरोबर श्रीकृष्णाची सुध्दा पूजा करतात. या दिवशी अंगणात रांगोळीच्या ठिपक्यांचे नाग काढतात. पाटावर चंदनाने पाच फण्यांचा नाग काढतात. नवनागांची नवे घेवून यथासांग पूजा करतात. या दिवशी तवा चुलीवर ठेवू नये. विळीने चिरू नये. तळण करू नये. वरील प्रमाणे नाग काढावा किंवा मातीचे दोन नाग आणावेत. पाटावर रांगोळी काढून त्यावर गहू पसरून नाग ठेवावेत. नागाची पूजा करावी.
पूजेचे साहित्य - हळद-कुंकू, फुले, गंध, अक्षता, जोन्धल्याच्या लाह्या, आघाडा, दुर्वा, फुटणे, गेजवस्त्र, दुसऱ्या दिवशी गारुडी लोक नाग घेवून रस्त्याने हिंडत असतात. आपल्या दारापुढे त्याला बोलावून नागाची वरील प्रमाणे पूजा करून दूध पाजावे. पुराणाचे दिंड व शक्य असल्यास एखादा जुना कपडा गारुड्याला द्यावा. लिंबू , भाजी वैगरे चीरण्याचे काम आदल्या दिवशी रात्रीच करावे. जिवतीचा कागद श्रावण महिन्याच्या सुरुवातीस जो वर येईल त्यादिवशी भिंतीवर लावावा व त्याची पूजा आठवड्यातून चार दिवस करावी. जिवतीला आघाडा, दुर्वा, फुले एकत्र करून त्यांची माळ करून घालावी. गौरी गणपती विसर्जनानंतर हळद-कुंकू वाहून अक्षता टाकून जिवतीचा कागद काढावा.
या दिवशीचा स्वयंपाक - पुरणाची दिंडे किंवा साखर खोबऱ्याची दिंडे करावीत. बाकीचे पदार्थ इतर सानाप्रमाणेच करावेत.
नावानागांची नावे - १) अनंत. २) वासुकी, ३) शेष, ४) पद्मनाभ, ५) तक्षक, ६) कालीय, ७) शंखापाल, ८) कंषांल, ९) धृतराष्ट्र
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment